आज मा. डॉ. वसंतराव देशपांडे यांची जयंती.

*आज २ मे*
*आज हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते मा. डॉ. वसंतराव देशपांडे यांची जयंती.*
जन्म. २ मे १९२० अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी
मा.वसंतराव देशपांडे यांचे शिक्षण नागपूर शहरात झाले. त्यांची आई एक शिक्षिका होत्या. त्या  जवळपासच्या देवळांमध्ये भक्तिसंगीतम्हणत अस. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयप्रवेश मिळून खर्‍या अर्थाने त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासालासुरुवात झाली. अर्थात त्याला कारणही खूप सुंदर, अकल्पित व प्रेरणादायी होते
साल १९२७, नागपुरातल्या तेल्लीपूर परिसरात एक ७ वर्षांचा मुलगा आपल्या घराकडे परतत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एका इमारतीच्या जिन्याखाली त्याने आडोसा घेतला. त्याच्या सहज गुणगुणण्याने मोहित होऊन त्या इमारतीतील एक वयस्कर सद्गृहस्थ खाली येऊन त्याला आपल्या घरात घेऊन गेले आणि तेच गाणे गायला सांगितले. आता तर त्याच्या आवाजावर ते बेहद खुश झाले. पाऊस ओसरल्यावर त्याला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचले. या मुलाच्या गळ्यात गाणे आहे व मी याला शास्त्रीय संगीतशिकवण्यास तयार आहे. तुम्ही याला माझ्याकडे सोपवा, अशी गळ त्यांनी त्या मुलाच्या आईला घातली! आमची आर्थिक कुवत नाही व त्याच्या शिकवणीचे पैसे मी देऊ शकणार नाही, या कारणास्तव त्याच्या आईच्या नकारावर, ‘मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी शिकवणार आहे,’ असे आश्वा सन त्यांनी दिल्याने आईने होकार देत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. त्या पावसाळी दिवसाने मा. वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याला ऐतिहासिक कलाटणी मिळाली. वयाच्या केवळ सातव्याच वर्षात ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयमध्ये प्रवेश मिळवून शास्त्रीय संगीतहा त्यांचा ऐतिहासिक प्रवासखर्याी अर्थाने सुरू झाला.
मा. वसंतराव देशपांडे यांनी हिंदी चित्रपट संगीतफारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने (१९५२), चाचा चौधरी (१९५३) व रंगबिरंगी (१९८३) या तीनच चित्रपटांत त्यांनी गायल्याची नोंद आहे. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा व भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. वयाच्या केवळ ८ व्याच वर्षी, त्यांची गायनकलाजाणून भालजी पेंढारकरयांनी कालियामर्दनया त्यांच्या चित्रपटात कृष्णाच्या भूमिकेत पदार्पणकरण्याची संधी दिली होती. मग एक उत्तम गायक, अभिनेता, ‘मराठी नाटक व चित्रपट संगीतकारम्हणून ते गाजले. बेगम अख्तर त्यांना आदराने गुरुजीसंबोधित करत, यातच त्यांची यशस्वी कारकीर्ददिसून येते. वयाच्या पन्नाशीपर्यंत गझल व ठुमरीया संगीत प्रकारातील एक प्रस्थापित गायकही ओळख मिळवूनही रसिकांसमोर ख्याल गायकीची संधीत्यांना मिळाली नव्हती, हे विशेष!
ग्वालियर घराण्याचेअधिकृत शिक्षण घेत असतानाच किराणा व भेंडीबजारया घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चीजामा. वसंतराव देशपांडे यांनी आत्मसात केल्या होत्या. मा.पु.ल. देशपांडे यांचा वसंतरावांवर खास लोभ होता, मा.पु.ल. देशपांडे यांनीच अनेक उस्तादअसणार्या. या शागीर्दला एकलव्यही उपमा/पदवी बहाल केली होती. मग अर्थातच, ‘परिपूर्ण गायकहा दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या उस्तादांच्या कृपेनेत्या प्रत्येकाच्या घराण्याच्या गायकीतील सत्वआपल्या गळ्यात उतरवून स्वत:च्या खास अशा गायकीलाजन्म दिला. पंडित दीनानाथ मंगेशकरयांच्या संगीत नाटकांचातो काळ होता. त्यांची स्टाईलवसंतरावांना इतकी भावली की, ‘कळतनकळतत्यांनी आपल्या गायकीमध्ये दीनानाथांची स्टाईल बहखुबीने आत्मसात केली’, जी प्रकर्षाने व हुबेहूब जाणवत असे, ज्याचा वसंतरावांना सार्थ अभिमान होता, हेही विशेषच!
मा. वसंतराव देशपांडे १९३८ साली मॅट्रिक झाले. लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस असणार्याा त्यांच्या मामांनी आपली संगीताची विशेष आवड व भाच्याचा गाता गळाया संयुक्त विचारांनी प्रेरित होऊन वसंतरावांना आपल्या सोबत लाहोरला घेऊन आले. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात लाहोर व आजूबाजूच्या परिसरात अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण व संगीत साधनायावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्याच अंतर्गत उस्ताद बडे गुलाम अली खॉं व उस्ताद बरकत अली खॉंया बंधूद्वयींची मैफल कधीही चुकवली नाही. ठुमरी व गझलया गायनकलेचा सूक्ष्मात जाऊन अभ्यास केला. याच काळात त्यांना असद अली खॉंनामे एका फकिराच्या गाण्याने मोहित केले. ते एका जमान्यात पतियाळा घराण्याचे गायकअसल्याची माहिती मिळताच वसंतरावांनी त्यांचा गंडाच बांधला. मग जवळपास सहा महिने केवळ मारवॉंहा एकच राग त्यांच्यापाशी शिकले. १९४२ मध्ये लाहोरहून परतल्यावर मग त्यांनी अर्थार्जनासाठी पुण्यात मिलिटरी अकौंटसखात्यात नोकरी व संगीतसाधनेसाठी पंडित सुरेशबाबू मानेयांचे शिष्यत्व (१९४२-१९५२) पत्करले. मग त्यांना भेंडीबजार घराण्याच्या उस्ताद अमजद अली खानयांचे मार्गदर्शन लाभले. याच काळात त्यांनी जवळपास ८० मराठी व २ हिंदीचित्रपटांसाठी पार्श्व गायन केले. पुण्यातील वास्तव्यात त्यांना पु.ल. देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी व बेगम अख्तरया दिग्गजांचा सहवास लाभला व शेवटपर्यंत हेच त्यांचं अत्यंत जवळचं व लाडकं मित्रमंडळराहिलं! कट्यार काळजात घुसलीया संगीत नाटकाने पंडित वसंतराव देशपांडे व अभिजात संगीतयांना सामान्य प्रेक्षकांच्या समोर आणले व याच नाटकाच्या माध्यमातून त्यांना अमाप प्रसिद्धी व रसिकाश्रयलाभला. १९६७ साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि नाटक, नाट्यसंगीत व अभिजात संगीतरसिकांनी हे नाटक अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. यातील खानसाहेब ही व्यक्तिरेखारसिकांच्या मनात इतकी भरली, ठसली व सामावलीकी त्यांना पु.ल. देशपांडे यांनी बहाल केलेली वसंतखॉं देशपांडेही पदवी खुशीखुशी व आनंदे’ ‘स्वीकारली, रुजवली व संबोधली’, असे उदाहरण एकमेव! या नाटकातील खानसाहेबया व्यक्तिरेखेच्या पदांना चाली लावताना पंडित जितेंद्र अभिषेकीयांच्या मनात पंडित वसंतराव देशपांडे ही व्यक्ती, त्यांची गायकी व स्टाईलहोती, हे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही! १९६७ ते १९८१ या १४ वर्षांच्या कालावधीत या नाटकाचे जवळपास ५२७ प्रयोग झाले यावरूनच वसंतरावांच्या गायकीची जादू व रसिकाश्रययाची प्रचीती येते. यासोबतच दूरदर्शनसाठी त्यांनी गायलेली अवीट गोडीची भजने व सुगम संगीतरसिकांच्या ओठांवर रुळलेले होतेच. अष्टविनायकया चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी आजही गणेशोत्सवातआपलं अस्तित्व टिकवून आहेत. कारण त्या तोडीची अवीट गणेशवंदनाआजतागायत तयार झालीच नाही, हेच खरं. किंबहुना म्हणूनच नाटक, चित्रपट व संगीत रसिकव रसिकोत्तर सामान्यांच्याही हृदयात वसंतरावांचं अढळपद चिरंतर आहे. १९६५ साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकून आपलं उर्वरित आयष्य भारतीय शास्त्रीय संगीतसेवेला वाहून टाकलं! १०६७ ते १९७७ हा दहा वर्षांचा अतिशय मोठा कालावधी कट्यार काळजात घुसलीया नाटकाने व्यापून टाकल्याने रसिकांना वसंतरावांच्या शास्त्रीय संगीत साधनायाचा हवा तेवढा लाभ मिळू शकला नाही, ही खंत आजही आहे. परंतु मराठी नाट्यसंगीताची वाटचालसोबतच त्यांच्या या त्यांच्या ऑडिओ सीडी व डीव्हीडीबंदिस्त रागदारी मैफलीरसिकांच्या संग्रही असून त्यांची अभिजात संगीताचीभूक, मन व कानतृप्त करत आहे. १९८३ मध्ये मा. वसंतराव देशपांडे यांना  संगीत कला अकादमी पुरस्कारप्राप्त झाला. मा. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडेयांनी कट्यार काळजात घुसलीया नाटकाच्या यशस्वी सादरीकरणानंतर संगीत संशय कल्लोळहे नाटक पुनश्चश रंगभूमीवर सादर केले आहे, त्या मुळे पुन्हा संगीत नाटकांना पुनश्चय चांगले दिवस येत आहेत. मा. वसंतराव देशपांडे यांचे ३० जुलै १९८३ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा. वसंतराव देशपांडे यांना आदरांजली.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ नितीन देशपांडे
*मा.वसंतराव देशपांडे  यांचे गायन.*

Comments

Popular posts from this blog

आज थोर साहित्यिक व गीतकार मा.शांताराम आठवले यांची पुण्यतिथी.

आज ४ मे आज प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक मा.बाबा कदम यांची जयंती.

आज मराठीतील व हिंदीतील जेष्ठ कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक गदीमा उर्फ मा.ग.दि.माडगूळकर यांची जयंती.